आपल्या आयुष्यात आपण एकदाच भाळतो..

आपल्या आयुष्यात आपण एकदाच भाळतो..
उरलेला सगळा वेळ आपण सांभाळन्यात घालवतो..
आणि जे जे सांभाळण्याचा  प्रयत्न करतो
ते ते कायम निसटुन जात असते..
मुठीत धरलेल्या वाळु सारख.. 
जितकी घट्ट मुठ आवळली तितकी टी निसटुन जाते...
नाते सुध्हा तसेच..
जे होते ते चांगल्यासाठीच असते..

स्वतःच अस्तित्व विसरून
दुसर्यान्मधे सुख पाहू नये
क्षणा क्षणाला गरज भासवी
इतक कोणाच्या जवळ कधी जाऊ नये

त्याच्याशिवाय जगण्याची
कल्पनाही करवणार नाही
एवढ कोणाच्या प्रेमात
खोल खोल बुडून जाऊ नये

प्रेम करावे पण मोजुन मापून
हिच सद्ध्या जगाची रित आहे
साथ कोणाची असेल तर उत्तमच
पण त्यासाठी याचक मात्र होऊ नये

आपल्या साठी त्या अनमोल अस्तात
दुसर्यांना त्यांचे काही महत्व नस्ते
भावनांचा आपल्या स्वतःच
बाजार असा मांडू नये.......

वर्षा पालकर 


Comments

Popular posts from this blog

रिमझिम पावसाची सर,

आयुष्य ते काय?